shaktikanta das Sakal.jpg 
अर्थविश्व

अर्थव्यवस्थेला कधी गती येणार? आरबीआय गव्हर्नरांनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघातानंतर संथ गतीने वाटचाल करत असतानाच राहिलेली उरली-सुरली कसर कोरोनाच्या विषाणूने भरून काढली. कोरोनाचे संकट आणि त्याला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कधी नव्हे ते देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) उणे स्वरूपात गेले. 2020-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशाचे आर्थिक उत्पन्न घटून -23.9 झाले आहे. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआयचे) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे म्हटले आहे. 

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी अर्थव्यवस्थेच्या ताज्या घडामोडी विषयी बोलताना ती पुन्हा प्रगतीच्या मार्गावर येत असल्याचे म्हटले आहे. माजी अधिकारी आणि वित्त आयोगाचे विद्यमान अध्यक्ष एन के सिंह यांनी लिहिलेल्या 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर : हाफ सेंचुरी ऑफ बीइंग अ‍ॅट रिंगसाइड' या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय बँकांनी घेतलेले निर्णय, तसेच सरकारच्या उदारमतवादी व आर्थिक चलनविषयक आणि वित्तीय धोरणांमुळे देश आर्थिक पुनरुत्थानाच्या जवळ असल्याचे शक्तीकांत दास यांनी यावेळेस सांगितले. 

याशिवाय आपण आर्थिक पुनरुज्जीवन करण्याच्या जवळ पोहोचलो आहे. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांकडे विकासाला पाठबळ देण्यासाठी पुरेसे भांडवल असणे महत्वाचे असल्याचे शक्तीकांत दास म्हणाले. तसेच काही वित्तीय संस्थांनी आधीच भांडवल उभे केले आहे. तर काही भांडवल उभे करण्याचा विचार करीत आहेत. आणि येत्या काही महिन्यांत ते नक्कीच भांडवल करतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला वित्तीय वाढीचा मार्ग निवडावा लागणार असल्याचे देखील त्यांनी यावेळेस म्हटले आहे. 

याव्यतिरिक्त, कोरोनाच्या संकटानंतर सरकारला वित्तीय तिजोरी मजबूत करण्यासाठी स्पष्ट आराखडा जारी करावा लागणार असल्याचे मत शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाचे हे संकट परतल्यानंतर भारताच्या पुढील वित्तीय योजनेविषयी सरकार माहिती सादर करेल अशी आशा असल्याचे त्यांनी यावेळेस म्हटले आहे. आणि सध्याच्या परिस्थिती मध्ये आर्थिक आणि वित्तीय दोन्ही धोरणांमध्ये उदार दृष्टिकोन अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT